अपडेटक्रीडामहाराष्ट्र

सिकंदर शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी…

Share this post

66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यात झाली. अंतिम लढतीत सिकंदर शेख याने शिवराज राक्षे याला पराभूत केलं आणि महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला.

पुणे जिल्ह्याच्या फुलगाव येथे महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत सिकंदर शेख आणि गतवर्षीचा विजेता शिवराज राक्षे यांच्यात झाली. या लढतीत सिकंदर शेख याने अवघ्या 10 सेकंदात शिवराज राक्षे याला चितपट करत महाराष्ट्र केसरीची गदा आणि महिंद्रा थार गाडी पटकवली. यावेळी सिकंदर शेख प्रतिक्रिया देत, गतवर्षीचा खरा विजेता मीच होतो असं सांगत यावर्षी मी गेली सहा सात महिने पुर्ण तयारी करून महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला याचं खरं श्रेय माझे वडील आणि कोच यांना जातं असे सांगतले. मागील वर्षी वाद खोटा उठवला होता आणि मागच्या वर्षीची सुद्धा खरा विजेता मीच होतो सांगत माझं पुढच ध्येय हे खूप मोठं आहे असं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने सांगितले.

महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावल्याबद्दल पैलवान सिकंदर शेख यास कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ आम्हा मोहोळ कुटुंबियांच्या वतीनं मानाची चांदीची गदा बक्षीस स्वरुपात दिली. यावेळी पैलवान सिकंदरचं मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छा दिल्या.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *