अपडेटमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

Share this post

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मजमोजणी पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी 22 तारखेपासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल आणि अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर ही तारीख निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. तर 30 ऑक्टोबरला छाननी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार असून विधानसभा निवडणुकांचे निकाल हे 23 तारखेला जाहीर केले जाणार आहेत.

राज्यात 288 जागांकरिता निवडणूक होणार असून २६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार असल्याचे राजीव कुमार यांनी जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ९. ६३ करोड मतदार मतदान करतील. तर राज्यात १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार असल्याचे कुमार यांनी जाहीर केले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *