महाराष्ट्रात मतदान कधी ? किती टप्प्यात होणार निवडणूक ? जाणून घ्या…
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल. दरम्यान महाराष्ट्रात निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊ.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19, 26 एप्रिल तसंच 7, 13 आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे
◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
