अपडेटक्रीडा

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा टी-२० सामना…

Share this post

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे टी-२० मालिकेसाठी खेळण्यासाठी तयार झाले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मालिकेसाठी भारताचा युवा संघ निवडण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील हा पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यासाठी मैदानाची पाहणी करण्यासाठी दोन्ही पंच संध्याकाळी ५.३० वाजता येतील. जर पाऊस किंवा कोणताही अडथळा सामन्यासाठी नसेल तर नियोजित वेळेत हा सामान सुरु केला जाईल. पण जर पाऊस असेल तर सामना कधी सुरु करायचा हा निर्णय पंच घेतील आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना सांगतील. सामना नियोजित वेळेत सुरु करण्याचा निर्णय झाला तर या सामन्याचा टॉस संध्याकाळी ६.३० वाजता होईल. यावेळी दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघा काही वेळ सराव करतील. सरावानंतर दोन्ही संघ सामन्यासाठी तयार होतील. हा सामना टॉस झाल्यावर अर्ध्या तासाने म्हणजेच संध्याकाळी ७.०० वाजता सुरु केला जाईल. हा टी-२० सामना आहे, त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही तर ३-४ तासांमध्ये हा सामना संपू शकतो. त्यामुळे आता नव्या आव्हानासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाहे दोन्ही संघ तयार झाले आहेत.

सूर्यकुमार यादवकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर या संघाच्या उप कर्णधारपदी आता ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे.

संघात ऋतुराजबरोबर इशन किशन आणि यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांनाही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आयपीएल गाजवणाऱ्या तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर असे तीन अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी यावेळी रवी बिश्नोईवर असेल. त्याचबरोबर या संघात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार या तीनपैकी दोन वेगवान गोलंदाजांना या सामन्यात संधी मिळू शकते.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *