अपडेटआर्थिक

बंद असलेलं बँक खाते पुन्हा सुरु करणं झालं सोपं, RBI ची नियमात सूट…

Share this post

आरबीआयने निष्क्रिय बँक खाती पुन्हा उघडण्याची प्रक्रिया शिथिल केली आहे. याशिवाय आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी नियमही काहीसे कडक करण्यात आले आहेत, जेणेकरून कोणीही निष्क्रिय खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयने म्हटले आहे की आता निष्क्रिय खाती पुन्हा सुरू करण्यासाठी फक्त ग्राहकाला केवायसी तपशील सबमिट करावा लागेल. केवायसी तपशील बँकेच्या कोणत्याही शाखेत सादर केला जाऊ शकतो. तर ही प्रक्रिया खातेदाराच्या विनंतीनुसार व्हिडिओ ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे (V-CIP) देखील पूर्ण केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने म्हटले की खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँका कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत. तसेच निष्क्रिय खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड आकारू शकत नाहीत. बँकांना बचत खाते निष्क्रिय असले तरीही त्यावर व्याज देणे सुरू ठेवावे लागेल. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, आरबीआयने बँकांना अशा बँक खात्यांची ओळख करण्यासाठी वार्षिक पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यात वर्षभरात कोणतेही व्यवहार झाले नाहीत.

आरबीआयने निवेदनात म्हटले की, ‘आर्थिक फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी निष्क्रिय खात्यांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय झाल्यानंतर त्यांच्यावरील व्यवहारांचे किमान सहा महिने उच्च स्तरावर परीक्षण केले जावे ज्याची माहिती ग्राहक व बँक कर्मचाऱ्यांना कळू नये. यामुळे निष्क्रिय खात्यांद्वारे होणारी फसवणूक कमी होण्यास मदत होईल.’ आरबीआयची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे १ एप्रिलपासून लागू होईल. प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांसह सर्व व्यावसायिक बँकांना या सूचनांचे पालन करावे लागेल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *