अपडेटतंत्रज्ञानमहाराष्ट्रराष्ट्रीय

आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय…

Share this post

आधार कार्ड हे दैनंदिन जिवनातील महत्वाचा दस्तावेज आहे. बॅंकेपासून सरकारी कामापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य असते.आता आधार नोंदणी सुलभ करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो.

सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. आधारसाठी पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना ‘IRIS स्कॅन’ वापरून नोंदणी करता येणार आहे.आधारसाठी पात्र असून फिंगरप्रिंट देऊ न शकलेली व्यक्ती केवळ IRIS स्कॅन वापरून नोंदणी करू शकते. त्याचप्रमाणे ज्या पात्र व्यक्तीचे बुबुळ कोणत्याही कारणास्तव घेतले जाऊ शकले नाही, ती केवळ फिंगरप्रिंट वापरून नोंदणी करू शकते.

बोट आणि बुबुळ दोन्ही बायोमेट्रिक्स प्रदान करू शकत नसलेल्या व्यक्तीचे नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख उपलब्ध बायोमेट्रिक्सशी जुळत असल्याचे त्यात म्हटले आहे. आतापर्यंत, UIDAI ने सुमारे 29 लाख लोकांना आधार क्रमांक जारी केले आहेत. UIDAI ने पहिल्या नावनोंदणी दरम्यान आधार क्रमांक का जारी केला गेला नाही? याची कारणे देखील तपासली. त्यानंतर आधार नोंदणी ऑपरेटरने असाधारण नावनोंदणी प्रक्रियेचे पालन केले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अस्पष्ट बोटांचे ठसे किंवा इतर तत्सम दिव्यांग व्यक्तींना पर्यायी बायोमेट्रिक्स घेऊन आधार जारी करावा असे सर्व आधार सेवा केंद्रांना सांगण्यात आल्याचेही इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *